Posts

Showing posts from January, 2019

तेल मीठ भाकरी...

आत्ता आपलं हॉटेल आहे. जे पाहिजे ते आणि पाहिजे तसं फक्त ऑर्डर केलं की तयार होतयं आणि खायला मिळतय... आता अशी सुरुवात केली की वाटेल एखादी मोठी सक्सेस स्टोरी बिरी सांगतो का काय, पण तसं काही नाही... आपल्या घरची परिस्थिती काय एवढी खराब नव्हती... किंबहुना चांगलीच होती... आई बाप शिक्षक. त्यामुळं भरपूर व्यवस्थित म्हणल तरी चालेल. पण त्यांची परिस्थिती एकदम खराब नसली तरी फारफार तर दोन वेळचं पोटभर जेवण मिळेल एवढी बरीच होती. तर विषय काय आहे आजचा की आज आमची आक्का आठवली. आक्का म्हणजे आमची आज्जी, वडिलांची आई... आमचे वडील चौथे म्हणजे त्यांच्या आधी तिघे... त्यात तिघांची सगळी पोरं म्हणजे आमची चुलत भावंड सगळी आमच्यापेक्षा मोठीच. म्हणजे मी ह्या दुनियेत यायच्या आधी तिला दहा नातवंड अलरेडी होती... म्हणजे मोठ्या तिघांची प्रत्येकी तीन आणि आमच्या वडिलांपेक्षा लहान चुलत्याची पहिली मुलगी... अशी टोटल दहा जण... त्यामुळे ते नातवंड याबद्दलच नवीन नवीन आकर्षण वगैरे सगळं तिला जुनं झालेलं असेल... आमच्या अक्ख्या परिवारात लेडीज मध्ये आमची आई फक्त नोकरीला... मग आपसूकच शाळेला आई गेली की आमची आक्का आणि काकूच आम्हाला सांभा...

जगणं सेलिब्रेट करा...

जीवन आणि मृत्यूचा खेळ कुणाला चुकलाय... जो जन्माला आला त्याचा मृत्यू अटळ आहेच... कुणीतरी म्हणलय की मृत्यू हे अंतिम सत्य आहे. अजून कुणीतरी म्हणलय की जन्म आणि मृत्यू ह्यांच्यामधला सारा खेळ म्हणजे जगणं असतं. “कुणी काय पण म्हणाना का आपल्याला काय त्याचं”, असं म्हणत आपण आपला रोजचा दिवस काढतो, पण काही गोष्टी आपल्याला त्यातून थोडासा वेळ काढायला कारण ठरतात. तुम्हाला वाटत असेल की का असं बरळत बसलाय हा आज.  तर किस्सा असाय की, अशीच एक बातमी बघण्यात आली. ४० दिवस कोमात असलेल्या मुलाच्या शुद्धीवर येण्याची. जगण सेलिब्रेट करण्याची. जन्म झाल्यानंतर काही तासातच हा चिमुकला कोमात गेला. बरं आई बाप गरीब, ना ऐपत ना पैसा. मोठ्या महागड्या दवाखान्यात दाखल करण्याचा प्रश्न तिथेच मिटला आणि बाळाची रवानगी सरळ सरकारी दवाखान्यात झाली. आपल्या इकडच्या सरकारी दवाखान्याच्या परिस्थितीचा जगात फेमस असा स्टेट्स आहे, पण इथ वेगळच घडल. डॉ रविंद्र रोकडे यांनी सर्व सूत्रे हातात घेत डॉ जान्हवी भोसले यांच्या बरोबरीने उपचारास सुरुवात केली. दवाखान्यातील ICU मध्ये बळावर तब्बल ४० दिवस उपचार करण्यात आले. ह्यात सर्वानी आपापल्या...

इकडेही लक्ष द्या...

न्यू इअर, राजकारण, खेळ आणि बऱ्याच अतिमहत्वाच्या गोष्टीत एक बातमी विरून गेलीय... जेंव्हापासून ही बातमी ऐकलीय तेंव्हापासून आपण माणूस म्हणून राहायच्या लायकीचे आहोत का हा प्रश्न पडतोय. तर बातमी अशी होती की, सात मुलींच्या जन्मानंतर आठव्या मुलाच्या प्रसुतीनंतर मातेचा आणि त्या मुलाचाही मृत्यू. एकतर सध्याच्या काळात ही अशी बातमी येते हीच खूप शरमेची बाब असून, जग कुठे चाललय आणि आपण काय करतोय हे दाखवून देणारी आहे. आपण एकीकडे गगनयान, बुलेट ट्रेनच्या बाजारगप्पा मारत असताना ह्या अशा प्रश्नाचे महत्व आपल्याला समजून येत नाही हेही खरय. चकाचक बातम्यांच्या राड्या रोड्यात ही बातमी कुठेतरी कोपऱ्यात येतेय... तो कोपराच आता खऱ्या मिडीयाचा आरसा आहे, बाकी सर्व जाहिरातीनी आणि निरुपयोगी राजकारणामध्ये अडकलाय. जेवढी जास्त लोकसंख्या वाढवता येईल तेवढी वाढवा असे सांगणारे धर्माचे कर्तेधर्ते ह्या मायलेकांच्या मृत्युबद्दल एक अवाक्षर ही काढणार नाहीत. लोकसंख्यावाढ ही धर्मोत्थानाची चळवळ असल्यासारखे त्यांचे बोलणे ह्या मायलेकांचा जीव परत आणू शकतील का? आणि हे कोणत्या स्पेसिफिक धर्माबद्दल बोलत नाहीय मी. सगळ्याच धर्मातून...